देणगी देऊन श्रीसमर्थ सेवेचा लाभ घ्यावा
समर्थभक्त कै.शंकरराव देव यांनी श्री समर्थ रामदासांची जन्मभूमी (जांब समर्थ, जि. जालना) शोधून काढली. त्या जागेवरच आज श्री समर्थ मंदिर उभे आहे. शतकपूर्तीकडे वाटचाल करीत असलेल्या या मंदिराची विश्वस्त संस्था नोंदणीकृत आहे. श्री क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिने विचार करण्याची पंरपरा विद्यमान विश्वस्त मंडळानेही चालू ठेवलेली आहे.
श्री क्षेत्राचे पावित्र्य कायम ठेवून श्री समर्थ विचारांच्या आधारे नित्य व नैमित्यिक कार्यक्रम चालत असतात. धर्म, अध्यात्म याबरोबरच सामाजिक भान ठेवून संस्थेची वाटचाल चालू रहावी यासाठी विश्वस्त मंडळ शक्य तेवढे सर्व प्रयत्न करीत आहे. मात्र या प्रयत्नांना समाजातील दानशूर भाविक जनांचे सहकार्य मोठ्या प्रमणावर अपेक्षित आहे. या कामी होणारे तन-मन-धनाचे सहकार्य म्हणजे श्री समर्थसेवा अर्थात श्री रामरायाची भक्तीच असेल यात शंका नाही. या पावनभूमीचं दर्शन घेण्यास आपण जसे उत्सुक आहात तसेच आपल्या स्वागतासाठी आम्हीही आतूर आहोत.
चला तर मग भेटू या आता श्री क्षेत्र जांब येथे...
डॉ. भारत कुलकर्णी
अध्यक्ष
श्री समर्थ मंदिर जांब समर्थ
श्री समर्थहृदय प.पू.नानासाहेब तथा शंकर श्रीकृष्ण देव
सध्या श्री क्षेत्र दर्शनास येणाऱ्या भक्तांची भोजन व निवास व्यवस्था मोफत केली जाते. त्यासाठी भक्त निवासात स्वतंत्रपणे १२ खोल्या, स्वच्छतागृह, २४ तास गरम पाणी यांची व्यवस्था केलेली आहे. या व्यवस्था अधिक विकसित करण्याचा प्रयत्न आहे.
संस्थेच्या १५ एकर जागेवर वनराई उभी करणे चालू आहे. या वनराईत औषधीसाठी उपयुक्त वृक्ष आहेत. वनराईला सुरक्षा कुंपण असून ठिबक सिचन पद्धतीचा वापर केला आहे.
भविष्यात येथे निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याचा विचार आहे.
येथील आनंदी नदीचे पुनरुज्जीवन गावकऱ्यांच्या सहकार्याने शक्य झाले आहे.
बजाज ट्रस्टच्या सहकार्याने येथील ग्रामस्थांना आरोप्लँटमधील शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्यात आले आहे. अवघ्या पाच रुपयांत वीस लिटरचा जार भरून दिला जातो.
श्री समर्थांच्या जीवनावरील प्रदर्शनी पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे.
श्री समर्थांच्या, तसेच त्यांच्या संदर्भात इतरांनी निर्माण केलेल्या वाङ्मयाचा अभ्यास, त्यावरील संशोधन यासाठी एक उत्तम संग्रहालय बनवण्याचा मनोदय आहे. ज्यात लिखित तसेच दृकश्राव्य साधनांचाही समावेश असेल.
श्री समर्थांच्या विचारांच्या आधारे राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारी बलोपासना तसेच जीवनोपयोगी संस्कार देणारे केंद्र उभे करण्याचा विचार आहे.
श्री क्षेत्र जाबची माहिती सर्वदूर पोहोचावी व युवापिढीला श्री समर्थ विचारातून प्रेरणा मिळावी यासाकरिता श्री समर्थांचा पदस्पर्श झालेल्या महाराष्ट्रासह देशातील अन्य स्थानांहून 'श्री समर्थ ज्योत' घेऊन युवा जत्थे 'श्रीरामनवमी' च्या शुभदिनी श्री क्षेत्र जांब येथे यावेत असा प्रयत्न आहे.
श्रीरामनवमी निमीत्त समर्थ विचारांवर आधारित स्पर्धा.